राज्यपाल भगत सिंह कोश्यारी संस्कृत भाषा संशोधनासाठी आग्रही

    16-Jan-2021
Total Views | 71
bhagat sing koshyari_1&nb



राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात विश्वविद्यालयाने वाटा उचलण्याचे आवाहन



नागपूर: संस्कृत ही देशातील सर्व भाषांचा आत्मा आहे. भारतातील प्राचीन साहित्याचा समृध्द ठेवा मोठ्या प्रमाणात संस्कृत भाषेमध्ये आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याचे काम कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात व्हावे. त्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात विश्वविद्यालयाने वाटा उचलावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.



रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात कोश्यारी यांच्या हस्ते ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञान -स्त्रोत केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या केंद्रामध्ये संस्कृत भाषेच्या संशोधनाचे कार्य होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. सी. जी. विजयकुमार, ज्ञानयोगी डॉ. जिचकार ज्ञान-स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. दीपक कापडे, सांदिपनी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री जिचकार उपस्थित होत्या.





राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सर्व कुलगुरूंच्या उपस्थितीची नोंद घेत, देशभरातील सर्व भागांमध्ये संस्कृतमध्ये उपलब्ध असलेल्या संदर्भग्रंथाचा अभ्यास राष्ट्रनिर्माणासाठी झाला पाहिजे, असे आवाहन केले. बदलत्या काळात वेद, आयुर्वेद नव्या परिवर्तनाची नांदी ठरू शकतात. पंतप्रधानांनी स्वदेशी संशोधनाला देखील मोठ्या प्रमाणात सन्मान दिला आहे. अशावेळी आपल्या जुन्या ग्रंथातून ज्ञानवृद्धी होत असेल तर त्यासाठी या विद्यापीठात संशोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठीच्या प्रयत्नांना गतिमान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.




 
आपल्या भाषणात त्यांनी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत आदराने उल्लेख केला. तसेच विद्यापीठातील कार्यक्रमानंतर राज्यपालांनी भोसलेकालिन सुप्रसिद्ध गड मंदिराला भेट दिली. त्यांनी गड मंदिराचा व परिसराचा इतिहास जाणून घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक स्वर्गीय गोळवलकर गुरुजी यांच्या रामटेक येथील जुन्या निवासस्थानाला देखील त्यांनी यावेळी भेट दिली.




अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121