सुशांत प्रकरण सीबीआयकडे गेलेले नाही : अनिल देशमुख

    08-Aug-2020
Total Views | 111
Anil Deshmukh_1 &nbs

११ तारखेला यासंदर्भात निकाल येईल; मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने, गृहमंत्र्यांचा दावा


मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारकडून करण्यात आलेली सीबीआय चौकशीची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली. परंतु, 'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आद्यार सीबीआयकडे गेलेलं नाही. प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. ११ तारखेला यासंदर्भात निकाल येईल. मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु आहे. मुंबई पोलिस याप्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास कोणतेही कारण नाही', अशी प्रतिक्रीया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.


सुशांतने १४ जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतने मानसिक दबावाखाली आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यावर मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. तर, मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असून, हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा प्रश्न येताच नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणत आहेत.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121