मुंबई : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बदल्यांचे नवे राजकारण होऊ पाहत आहे. अशामध्ये यावरून महाराष्ट्र सरकारवर भाजप तसेच विरोधी पक्षाकडून वेळोवेळी टीका केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात नव्या ट्रान्सफर मंत्रालयाची स्थापना झाली असल्याची खोचक टीका ट्विटरवरुन केली. याआधी राज्यातील मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी केला होता.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विटरवरून सांगितले आहे की, “महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नाव आहे ट्रान्सफर मंत्रालय, मंत्री हे कोणी एक दोन नाहीत, तर अनेक आहेत. या मंत्रालयाचं 'बजेट' नाही... 'टार्गेट' असते,” अशी टीका करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.