“महाविकासआघाडीत कॉंग्रेसला कोण विचारत?”

    18-Jul-2020
Total Views | 552

Harshavardhan Patil_1&nbs
 
मुंबई : राज्यातील काही भाजपचे आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात कुठलाही चमत्कार घडू शकतो. असा दावा कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला होता. यावर आता भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पलटवार केला असून ‘कॉंग्रेसला महाविकासआघाडीत कोण विचारत?’ असा सवाल केला आहे. तसेच, ‘सध्या काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत.’ असेही ते म्हणाले.
 
 
‘नको त्या विषय उकरून काढण्याऐवजी राज्य सरकारने सध्या कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करावे. प्रशासन कुठे आहे तेच दिसत नाही.’ अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. तसेच, कोणताही भाजप नेता नाराज नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, धनंजय महाडिक, विनय कोरे, रणजीतसिंग नाईक निंबाळकर या नेत्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.
अग्रलेख
जरुर वाचा
जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते. हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121