राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राचे नामकरण

    05-Dec-2020
Total Views | 238


गुरुजिओ_1  H x






नव्या संकुलास गोळवलकर गुरुजींचे नाव.



तिरुअनंतपुरम: राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्राचे दुसरे संकुल लोकार्पणासाठी सज्ज झाले आहे. आणि या संकुलास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव गोळवळकर यांचे नाव देण्यात येणार आहे. या नामकरण सोहळ्याचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. यावेळी उपस्थित केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली.

 
 

सदर संशोधन केंद्राचे नामकरण ‘श्री गुरुजी माधव सदाशिव गोळवळकर’ नॅशनल सेटर फॉर कॉम्प्लेक्स डिसीज ईन कॅन्सर अॅन्ड व्हायरल इन्फेक्शन” असे करण्यात येणार आहे. आरजीसिबीचे दुसरे संकुल हे उच्चस्तरावरील नव-नवीन उपक्रमांचे अद्ययावत माहिती केंद्र असेल, असे वक्तव्य डॉ. हर्षवर्धन यांनी केले.

 
 

आरजीसिबीच्या दुसऱ्या संकुलात स्टेम सेल प्रत्यारोपण, जीन उपचार, मॉलेक्युलर ट्युमर यावरील उपचारींचीही सुविधा उपलब्ध असणार आहे. २२ डिसेंबर ते २५ डिसेंबर या दरम्यान आरजीसीबी ‘भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान’ महोत्सवाचे सहावे सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121