इलेक्ट्रिक रिक्षा हा रोजगाराचा नवा पर्याय - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले.

    03-Dec-2020
Total Views | 115

rikshs_1  H x W



ही रिक्षा रोजगाराची नवी संधी देणारी आणि प्रदूषणविरहित वाहन असल्याचे प्रतिपादन




मुंबई: इलेक्ट्रिक रिक्षा ही प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक असून बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी देणारी असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे इलेक्ट्रिक रिक्षा चे उदघाटन केल्यानंतर रामदास आठवले पत्रकारांशी बोलत होते.
 
 
 
 
इलेक्ट्रिक रिक्षा घेण्यासाठी बेरोजगारांना बॅंकांद्वारे कर्ज उपलब्ध व्हावे तसेच महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाद्वारे मागासवर्गीय बेरोजगारांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बैठकीचे आयोजन रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. आजच्या स्पर्धात्मक युगात बेरोजगारांना रोजगार म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. इलेक्ट्रिक रिक्षा हे प्रदूषणविरहित वाहन आहे. बेरोजगारांना रोजगार म्हणून इलेक्ट्रिक रिक्षा, मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक रिक्षा या वाहनांचा लाभ घ्यावा असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले.
 
 
 
 
सदर कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, नेक्स्टजेन क्लीनटेक सोल्युशन कंपनी चे शंकर कन्नन, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे व्यवस्थापक गेडाम आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121