मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे अतिशय चुकीचे! माणिकराव कोकाटेंच्या 'त्या' वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

    22-Jul-2025
Total Views | 13


मुंबई : मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे अतिशय चुकीचे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शासन भिकारी आहे, शेतकरी नाही, असे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना फटकारले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ते काय बोलले ते मी ऐकलेले नाही. परंतू, जर त्यांनी असे वक्तव्य केले असेल तर मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे अतिशय चुकीचे आहे. पीक विम्यासंदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धत बदलली. कारण पीक विम्यात काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत, हे आपल्या लक्षात आले. त्यामुळे त्याची पद्धती बदलली. ती पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा घेतला की, शेतकऱ्यांना मदत तर करूच, त्यासोबत दरवर्षी ५ हजार कोटी रुपये शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून सुरुवातदेखील केली आहे. ५ वर्षात २५ हजार कोटी रुपये शेतीतील गुंतवणूक आपण वाढवत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य काही योग्य नाही. देशातील कुठल्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेत आजही सगळ्यात चांगली अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे," असे ते म्हणाले.


कृषीमंत्री काय म्हणाले?

"शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते. आम्ही शेतकऱ्याला एक रुपया देत नाही. त्यामुळे शासन भिकारी आहे. शेतकरी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे. एक रुपयाच्या विम्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच-साडेपाच लाख बोगस अर्ज माझ्याच काळात सापडले. मी ते बोगस अर्ज तत्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या," असे विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121