पनवेल : प्राप्तिकर विभागाला छापेमारीत आढळली १६३ कोटींची माया

    16-Dec-2020
Total Views | 283

IT_1  H x W: 0
 
 



बांधकाम व्यावसायिकांची झाडाझडती; वाशीमध्येही कारवाई


नवी दिल्ली : ‘टॉप्स’ समूहाच्या कथित आर्थिक गैरव्यहारप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरु केल्याचे ऐकिवात असतानाच प्राप्तिकर विभागानेही (आयटी) पनवेल, वाशीसह सभोवतालच्या विविध भागांत छापेमारी सुरू केल्याचे खळबळजनक वृत्त आहे. आपल्या छापेमारीदरम्यान प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी काही बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी करत झाडाझडती सुरु केली आहे. प्राप्तिकर विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी नामवंत बांधकाम व्यावसायिक आणि एन्ट्री ऑपरेटर्स यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये पनवेल भागात छापे घातले.
 
 
 
पनवेल आणि वाशीतील २९ ठिकाणी शोध आणि सर्वेक्षणाची कारवाई करण्यात आली. या समूहावर केलेल्या कारवाईमध्ये फ्लॅट आणि जमिनीच्या विक्रीतून मिळालेली बेहिशोबी उत्पन्नाची तसेच विशिष्ट बनावट कंपन्यांच्या नावाने विनातारण कर्जाची माहिती उघड झाली. छाप्यातील शोध आणि सर्वेक्षण कारवाईदरम्यान या समूहाच्या लेखापरिक्षण पुस्तकांमध्ये ५८ कोटी रुपयांच्या व्याजासह विनातारण कर्जांच्या बनावट नोंदी सापडल्या. तसेच जमीन खरेदी व्यवहारात ५ कोटी रुपयांच्या बेहिशोबी खर्चासह १० कोटी रुपयांच्या बनावट सबकॉन्ट्रॅक्ट खर्चाचे तपशीलही सापडले.
 
 
 
त्याशिवाय या समूहाने मिळवलेल्या ५९ कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचे पुरावे सापडले. जमिनीच्या खरेदीसाठी दिलेली आगाऊ रक्कम म्हणून हे उत्पन्न दाखवण्यात आले होते. जमिनीच्या खरेदीसाठी पाच कोटी रुपयांची गुंतवणूक त्याचबरोबर ११ कोटी रुपयांची विविध लाभार्थ्यांनी दिलेल्या रकमेची नोंद सापडली. या माहितीची छाननी करण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय १३.९३ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड देखील या छाप्यामध्ये सापडली आणि प्राप्तिकर विभागाकडून ती जप्त करण्यात आली. त्यामुळे या समूहाकडे आतापर्यंत रोख रकमेसह १६३ कोटी रुपयांचे बेहिशोबी उत्पन्न आढळले आहे. सदनिका आणि जमिनींच्या विक्रीसाठी ऑन मनी घेऊन त्याची कागदोपत्री कोणतीही नोंद न ठेवण्याचे पुरावे देखील जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अ‍ॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121