"गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात"

    16-Dec-2020
Total Views |

Atul Bhatkhlkar_1 &n
 
 
 
मुंबई : बुधवारी आरे कारशेड कांजुरमार्ग येथे हलवण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच धक्का दिला. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे कामकाज तात्काळ थांबविण्याचे निर्देश उच्च न्यायालायने एमएमआरडीएने दिले. यावर आता ठाकरे सरकारवर भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड सुरु केली आहे. "गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात", अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
 
 
 
 
 
उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या निर्णयावर त्यांनी ट्विट केले की, "मेट्रो कारशेडचा प्रकल्प पुन्हा बारगळणार. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे एमएमआरडीएला निर्देश दिले आहेत. गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात. जनतेची विटंबना, वेळेचा अपव्यय, पैशाचा चुराडा आणि अब्रूचे खोबरे हीच महाविकास आघाडी सरकारची खरी कमाई." अशी टीका त्यांनी केली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
महाराष्ट्रात ४ वर्षांत ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता

महाराष्ट्रात ४ वर्षांत ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता

गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रातून ३८ हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात नागपूर शहरातील ५ हजार २२७ महिला आणि अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत ४१ हजार १९३ मुला-मुलींचा शोध लावला असून, आता महिलांसाठी ‘ऑपरेशन शोध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १७ एप्रिल ते २५ मे या कालावधीत ४ हजार ९६० महिला आणि १३ हजार ६४ बालकांचा शोध लावण्यात यश आले. विशेष म्हणजे, नोंद नसलेल्या ७०३ बेपत्ता बालकांचाही शोध लागला, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121