भाजपचा 'पंच' : महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षपदी पाच नव्या नेत्यांची नियुक्ती

    19-Aug-2019
Total Views | 96



मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी संघटनात्मक बदल केले. महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षपदी मुंबईतील माजी खासदार किरीट सोमय्या, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, प्रवीण पोटे-पाटील, योगेश गोगावले आणि अशोक कांडलकर यांची नियुक्ती केली आहे.

 

ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जालनाच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्षपदी गिरीश पालवे, यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

भाजपच्या मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी तर सहमुख्य प्रवक्ता म्हणून केशव उपाध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मधू चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाठ, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर या सर्वांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तर इतर जबाबदाऱ्यांमुळे काही नेत्यांना त्यांच्या आधीच्या पदांवरून मुक्त करण्यात आले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121