शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींच्या मदतनिधीची तरतूद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2019
Total Views |




मुंबई
: राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून १० हजार कोटींची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसे आदेश ही प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर जाहीर केले.



दरम्यान काल झालेल्या बैठकीत अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. "राज्यातील शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले
, याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याने कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई द्यावी याबाबत आज निर्णय घेण्यात आला नाही. मात्र येत्या २ ते ३ दिवसांमध्ये नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल" ,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.






"राज्याचे मंत्री व प्रशासकीय अधिकारी नुकसान झालेल्या भागांची पाहणी करत असून एकूण परिस्थितीची माहिती हाती येईल. झालेल्या नुकसानीची वर्गवारी करून त्यानुसार नुकसानभरपाई दिली जाईल. यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल," असेही फडणवीस म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@