जपानला 'हगिबिस'वादळाचा तडाखा ; मोदींनी व्यक्त केला शोक

    13-Oct-2019
Total Views | 50



टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे सुपर टायफून हगिबिस वादळामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली. या वादळामुळे आत्तापर्यंत १४ जण ठार तर १६ जण जखमी झाले आहेत. तर १७ जण बेपत्ता आहेत. जपानी सरकारने आतापर्यंत एक लाख लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. जपानी मेटेरोलॉजिकल एजन्सीने (जेएमए) म्हटले आहे की,"शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) हागीबिस वादळाचा तडाखा बसला. तसेच जेएमए ने इबाराकी, तोचिगी, फुकुशिमा, मियागी आणि निगाता प्रदेशात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे, अशी माहिती सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे. या वादळाच्या आदल्या दिवशी जपानमध्येही ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्याचे केंद्रबिंदू चिबा-केन प्रदेशात ८० किलोमीटर खोलवर नोंदले गेले होते. क्योडो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील अनेक नद्या ओसंडून वाहात आहेत. पूर, दरड कोसळलेल्या मध्य, पूर्व आणि ईशान्य भागात बचावकार्य सुरू आहे. जपानच्या होन्शु बेटाच्या मुख्य बेटावरील तब्बल सहा लाख लोकांना तेथून बाहेर काढण्याचा सल्ला देण्यात आला.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जपानमधील सुपर-टायफून हागीबिसमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि नैसर्गिक आपत्तींविरूद्ध लढा देण्यात सज्ज असलेल्या टोकियोचे कौतुक केले. "जपानमधील सुपर-टायफून हागीबिसमुळे झालेल्या जीवित हानीबद्दल मी सर्व भारतीयांच्या वतीने शोक व्यक्त करतो. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर पूर्ववत व्हावी अशी माझी इच्छा आहे."


पुढे ते म्हणाले, "मला खात्री आहे की जपानी लोकांची सज्जता व लवचीकपणा आणि माझे मित्र अ‍ॅबेशिन्झो यांचे नेतृत्व या आपत्तीचा प्रभावीपणे सामना करतील. नैसर्गिक आपत्तींविरूद्ध जपानच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. या कठीण घडीला भारत जपानबरोबर आहे, असे मोदींनी ट्विट केले.

अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121