जयपूर : राजस्थानमध्ये स्वाईन फ्ल्यूने पुन्हा डोके वर काढले असून अनेक लोकांना याची लागण झाली आहे. राज्यात दररोज ५० ते ६० स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण समोर आले आहेत. मागील १८ दिवसामध्ये ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकार विविध उपाय करत आहे. राज्य सरकारचे वैद्यकीय कर्मचारी २१ ते २३ तारखेपर्यंत लोकांच्या घरी जाऊन तपास करणार आहेत. त्यानंतर स्वाईन फ्ल्यू थांबवण्यासाठी उपाय करणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आजारी व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर त्यावर उपाचार केला जाईल.
मागील २४ तासांमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या नवीन ६३ घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत भर पडली असून एकूण १ हजार ९९ प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला. आजाराचा वाढती तीव्रता लक्षात घेऊन २१ तारखेपासून वैद्यकीय विभाग संपूर्ण राज्यामध्ये स्क्रिनिंग सुरु करणार आहेत. आरोग्य आयुक्त आर. प्रसन्ना यांनी सांगितले की, "रुग्ण सीएचसी किंवा जिल्हा रुग्णालयाशिवाय मेडिकल महाविद्यालय रुग्णालयात स्वाईन फ्लूवर उपचार घेऊ शकतात. तसेच, नमुने नेहरू मेडिकल महाविद्यालय रायपूर सोबतच जगदलपूर महाविद्यालयामध्येही देऊ शकतात. त्याची तपासणी दोन्ही महाविद्यालयाच्या वायोरॉलॉजी लॅबमध्ये होत आहेत. त्याचे निकालही दोन दिवसांमध्येच मिळत आहेत. यामुळे रुग्णांचा सुलभरीत्या उपचार होत आहे."
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/