ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू नये म्हणून वृध्दास पळविले

    06-Sep-2018
Total Views | 24
 
 
ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू नये म्हणून वृध्दास पळविले
नंदुरबार, 6 सप्टेंबर
ग्रामपंचायतीच्या निवडणुकित उभे राहू नकोस म्हणून 65 वर्षीय वृध्दास पळवून नेल्याची घटना नंदुरबार तहसिल कार्यालयात घडल्याने खडबळ उडाली आहे. याबाबत नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
 
हिलाल रामचंद्र वळवी वय 65 रा.अक्राळे ता. , जि. नंदुरबार, हे 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास त्यांचे मित्र मंÏच्छद्र पाटील यांच्यासह तहसिल कार्यालय येथे हजर असतांना , आरोपी विरेंद्र अहिरे व त्याचा भाऊ(पुर्ण नाव माहित नाही) तसेच 8 ते 10 इसमांनी त्यांना गालावर मारहाण करुन तुमच्या तंगडया तोडून टाकील अशी धमकी दिली. दोन मोटर सायकलवरती त्यांना बसवून विरेंद्र अहिरे यांच्या ऑफिसमध्ये घेवून जावून हिलाल वगळी व त्यांचा मित्र यांना 8 ते 10 जणांनी मारहाण करुन त्यांचे जातपडताडणीसाठी लागणारे जातीचा दाखला, आधार कार्ड, शाळेचा दाखला, आधार कार्ड, शाळेचा दाखला हिसकावुन त्यांना ऑफिसमध्ये बंंद करुन ठेवले व संध्याकाळी सोडून दिले.
 
 
हिलाल वळवी यांच्या फिर्यादिवरुन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. रुपाली पाटील करत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121