ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आभा परिवर्तनवादी संस्थेचा पुढाकार

    01-Jul-2018
Total Views | 36





टिटवाळाः गुणवत्ता असूनही केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी आजही खडतर कष्ट करावे लागतात. प्रसंगी शिक्षणाची ही वाट परिस्थितीपुढे हतबल होत अर्धवट सोडावी लागते. अशा मुलांचा हा संघर्ष कमी करण्याच्या हेतूने आभा परिवर्तनवादी संस्था मागील पाच वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ’खारीचा वाटा हा उपक्रम चालू केला आहे.

गेल्या वर्षांपासून चालू केलेल्या ‘खारीचा वाटा या उपक्रमा अंतर्गत यंदा खेड, महाड आणि पोलादपूरमधील दहा दुर्गम शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले गेले. गेल्या वर्षी ११० तर यंदा २५० विद्यार्थ्यांना आभाच्या माध्यमातून हा खारीचा वाटा देण्यात आला. आपले मित्र आणि स्वतःचे पैसे असा निधी जमवून कार्यकर्त्यांनी हे साहित्य संस्थेच्या माध्यमातून मुलांना दिले. फक्त साहित्यच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महिन्यातून एकदा शाळांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने आणि चर्चासत्र यापुढे संस्थेतर्फे ठेवण्यात येणार आहे.

मुंबईतील ही तरुणांची संघटना सतत विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील असते. ज्याला शक्य आहे, त्याने जरी एका विद्यार्थ्याच्या खर्चाची जबाबदारी उचलली तरी या मुलांच्या यशाचा सुगंध अवघ्या विश्वात दरवळेल, अशी खात्री संस्थेचे कार्यकर्ते शशांक भुवड यांनी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात व्यक्त केली. मदतीसाठी इच्छुक असलेल्या दानशूर व्यक्तींनी पुढील क्रमांकावर संपर्क करावा : अविनाश पाटील : 8080171430

अग्रलेख
जरुर वाचा
‘स्वयंपुनर्विकास’ ही ठाणेकरांचीही गरज ‘माझी सोसायटी‘ भावनेतून पालकत्व स्वीकारा भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांची ठाणे जिल्हा बँकेला विनंती

‘स्वयंपुनर्विकास’ ही ठाणेकरांचीही गरज ‘माझी सोसायटी‘ भावनेतून पालकत्व स्वीकारा भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांची ठाणे जिल्हा बँकेला विनंती

स्वयंपुनर्विकास ही ठाणेकरांचीही गरज आहे. लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन नागरिकांना ताकद कशी देता येईल त्याचबरोबर ठाणे जिल्हा बँकेने जास्तीत जास्त शिथिलता आणून जास्तीचे कर्ज उपलब्ध करावे. केवळ धोरण आणून चालणार नाही तर सोसायटीला ‘माझी सोसायटी’ या भावनेतून समजून घेत त्यांचे पालकत्व ठाणे जिल्हा बँकेने स्वीकारावे, अशी विनंती भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केली. ते शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीने स्वयंपुनर्विकासासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या ..

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121