जम्मू-काश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांचा खात्मा

    22-Dec-2018
Total Views |

 

 
  
पुलवामा : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या दहशवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
 

अवंतीपोरा येथील त्राल परिसरात असलेल्या आरमपोरा या गावात दहशतवादी लपून बसले होते. ही माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. शनिवारी सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसरात लपून बसलेल्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम राबवली. दरम्यान, दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांकडून ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर हे ऑपरेशन संपल्याचे जवानांनी स्पष्ट केले.

 

या चकमकीमध्ये मारण्यात आलेले दहशतवादी हे झाकीर मुसाच्या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या वर्षभरात २३० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्याच आठवड्यात पुलवामा येथे असलेल्या सिरनू गावात सुरक्षा दलाच्या जवानांनी ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. परंतु त्यानंतर तेथील स्थानिक तरुण रस्त्यावर उतरले होते. यावेळी ६ तरुणांचा मृत्यू झाला होता.

 
 
   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121