वरणगाव :
शासनाच्या वतीने 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी मोफत रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी बाऊ न करता ती लस घेतली पाहिजे.
या लसीमुळे भविष्यात मुलांना गालफुगी व गोवर या आजारांपासून त्यांचा बचाव होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी या लसीचा बाऊ करू नये, असे प्रतिपादन आर. आर. निकुंभ यांनी केले.
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे रुबेला लसीकरण जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन या लसीकरणाची जनजागृती केली.
रॅलीचे उद्घाटन प्राचार्य आर. आर. निकुंभ यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक एस. जे. चौधरी, आर. पी. कुळकर्णी, एस.आर. काळे या कार्यक्रमाचे समन्वयक आर.डी. पाटील, एल.व्ही.नेमाडे, आर.एस. सोनवणे, आर. के. सपकाळे उपस्थित
होते.