जळगाव :
वजनकाट्यावर लक्ष देऊन आपला आहार घेऊ नका तर आपली जीवनशैली बदला.आपल्याला चांगले वाटणे महत्वाचे आहे आपण आरामदायी असाल, रोज रात्री शांत झोपू शकत असाल तर आपला आहार योग्य आहे, असे समजण्यास हरकत नाही, असे ऋजुता दिवेकर यांनी सांगितले.
स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल व कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या सहकार्याने रविवारी ख्यातनाम आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
मागील 17 वर्षापासून प्रतिष्ठान संगीत क्षेत्रात कार्य करीत आले आहे. या विशेष कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या डॉ. भावना जैन, ज्योती जैन, दलिचंद जैन उपस्थिती होती.
सुरुवात प्रतिष्ठानच्या परंपरे प्रमाणे गुरुवंदनेने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्या डॉ. भावना जैन, ऋजुता दिवेकर, दीपिका व दीपक चांदोरकर व अरविंद देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वालन झाले., दीपक चांदोरकर यांनी ऋजुता दिवेकर यांचा परिचय करून दिला.
जास्त विचार करु नका...
ऋजुता दिवेकर पुढे म्हणाल्या की, आपणच आपल्या शरीराचे मूल्यमापन/निरीक्षण करा आपले पाय दुखत नसतील, अंग दुखत नसेल व आपण आपल्या पायावर व्यवस्थित उभे राहत असाल तर आपला आहार चांगला आहे त्यामुळे आपण किती कॅलरी खातोय, यात प्रोटीन किती आहेत, ओमेगा 3 आहेत का..., याचा विचार करू नका, असेही ऋजुता दिवेकर यांनी सांगितले.त्यांनी उपस्थितांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरेसुद्धा दिली.
सूत्रसंचालन आणि आभार अरविंद देशपांडे यांनी केले.यशस्वीतेसाठी मयूर पाटील, जुईली कलभंडे, शाळीग्राम राणे यांनी परिश्रम घेतले.ऋजुता दिवेकर यांना ऐकण्यासाठी जळगावकर आरोग्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती उस्फूर्त दिली.