भुसावळात उपोषणकर्त्या महिलेची तब्बेत खालावली

    21-Nov-2018
Total Views | 19

प्रांताधिकार्‍यांना दिले विविध संघटनांनी निवेदन


भुसावळ : 
येथील आरपीडी रोडवरील हद्दिवाली चाळ, चांदमारी चाळ व आगवालीचाळीसह आरपीडी रोडवरील रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढल्याने पर्यायी जागेसाठी अतिक्रमणधारकांनी सोमवारपासून उपोषणाला सुरूवात केली आहे.
 
उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी उपोषणकर्ती महिला मथूराबाई पवार यांची प्रकृती खालावली. यावेळी पालिकेच्या वैद्यकीय पथकाने उपोषण कर्त्यांची तपासणी केली. प्रांताधिकारी कार्यालयासमोार मोठ्या प्रमाणावर उपोषणालाला अतिक्रमणधारक बसले आहे.
 
 
येथील आरपीडी रोडवरील अतिक्रमण रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आले आहे. अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा न देता त्यांच्या अतिक्रमणावर रेल्वे प्रशासनाने हातोडा चालविला.यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आले आहे.
 
अनेक जणांकडे जागा नसल्याने त्यांचा संसार उघड्यावरच आहे. भाड्याचे घरेही मिळाली नाही. पालिकेच्या जागेवरील व्यावसायीकांचे दुकाने सुध्दा रेल्वे प्रशासनाने अतिक्रमणात असल्याचे भासवून काढल्याचा आरोप उपोषणार्थीमधून केला जात आहे.
 
आरपीडी रोड हा पालिकेच्या हद्दित असतांना सुध्दा रेल्वे प्रशासनातर्फे अतिक्रमीत असल्याने काढले, यामुळे मो्ठ्या प्रमाणावर अन्याय करण्यात आला आहे.
 
अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी मथूराबाई पवार यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपोषणस्थळी येत तपासणी
केली
आ.सावकारे, नगराध्यक्ष यांची तब्बल दोन तास चर्चा
 
अतिक्रमणावर तोडगा काढण्यासाठी आणि अतिक्रमणधशरकांना पर्यायी जागा देण्याच्या दृष्टीने आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा. सुनील नेवे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, रमेश मकासरे, गिरीष महाजन, राजू सूर्यवंशी, रवींद्र खरात, बाळा पवार, विनोद सोनवणे आदी उपस्थित होते.
 
प्रा. नेवे यांच्या निवासस्थानी मंगळवारी दुपारी अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या पाश्वभुमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर चर्चा झाली, अतिक्रमणधारकांना कायम स्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
 
शासनाकडे जागेची मागणी केली जात आहे. जिल्हाधिकारी यांच्यांशी या प्रकरणी चर्चा केली जाणार आहे. अतिक्रमणधारकांना त्यांच्या हक्काची जागा देण्यासाठी पालिकेचे प्रयत्न आहे.
 
पालिकेची कोणतही जागा शहरात नाही. त्यामुळे शासनाकडून जागा घेतली जाणार असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.
संघटनांचे प्रांताधिकार्‍यांना साकडे
 
रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढले असल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहे. याकडे शासकीय यंत्रणा आणि सत्ताधारी राजकीय मंडळींचे दुर्लक्ष होत आहै.
 
स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मनावर घेतले असते तर अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन झाल्यावर अतिक्रमणाचा विषय करता आला असता, मात्र कोणीही लक्ष दिले नसल्याने अतिक्रमणधारकांच्या अडचणी वाढल्या आहे.
 
थंडीच्या दिवसात त्यांना उघड्यावर राहावे लागत आहे. तालुक्यातील दिपनगर वीज केद्राजवळील झोपडपट्टी हटविण्यात आली, त्यावेळी सुध्दा तेथील अतिक्रमणधारकांचे पूनर्वसन करण्यात आले होते.
 
या प्रकाराला रोखण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे अरूण दामोदर, शामकुमार वासनीक, आनंद ससकाळे, नरेश वाघ, रेखा घोडेस्वार, सुरेश गणवीर, शिवदास मेढे यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे.
150 नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन
 
1 ऑगस्ट 2016 आणि 14 ऑक्टोबर 2016 ला ग्रा. पं. ला तक्रार अर्ज दिल्यानंतरही त्याचा नियमित पाठपुरावा या परिसरातील नागरिक करत आहेत.
 
तरीसुद्धा समस्या निकाली निघाली नसल्याने 16 रोजी आ. संजय सावकारे यांना सुमारे 150 पेक्षा अधिक नागरिकांच्या स्वाक्षरींचे निवेदन आ. संजय सावकारे यांना देऊन किमान मूलभूत सुविधा तरी उपलब्ध करुन देण्याची विनंती करण्यात आली आहे.
 
12 वर्षांपासून तक्रारी केल्या जात असून ढिम्म प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने रेणुका मंदिर परिसरातील नागरिकांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाने वार्‍यावर सोडले आहे का? अशीच संतप्त भावना निर्माण झाली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121