...तर राज्यात होणार दुष्काळ जाहीर

    08-Oct-2018
Total Views |


 

 

जळगाव: विविध जिल्ह्यांची माहिती घेऊन येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळाची घोषणा केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते जळगाव येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदा राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच राज्यातील विविध जिल्ह्यांची पाहणी करत आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन शासकीय यंत्रणेला उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. महसूल व कृषी विभागाकडून आम्हाला अहवाल प्राप्त होत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

 

तसेच प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रामीण) जिल्ह्याने चांगली प्रगती केली असून जिल्ह्यातील बेघर नागरिकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी घरकूल योजना मोहिम स्तरावर राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ग्रामसडक योजना तसेच अन्य योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमत्र्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबतही बैठक झाली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, गुन्ह्यांचा आलेख तसेच पोलिसांच्या घरांच्या विषयावरही चर्चा केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121