‘कुछ कुछ होता है’ झाले २० वर्षांचे

    16-Oct-2018
Total Views | 38

 

 

 
 
 
मुंबई : २० वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच दिग्दर्शक करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आज या गोष्टीला २० वर्षे पूर्ण झाली असल्याने करण जोहर भलताच खुशीत आहे. ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा आजही टीव्हीवर लागला की प्रेक्षक तो आवर्जून पाहतात. हा सिनेमा तर हिट ठरलाच. पण त्यातील गाण्यांनीही रसिक प्रेक्षकांवर जादू केली होती. पण विशीत पदार्पण करणाऱ्या बॉलिवुडमधील या अजरामर कलाकृतीविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
 
 

म्हणून ‘कुछ कुछ होता है’ ची सुरुवात या गाण्याने होते.....

 

 
 

एक दिग्दर्शक म्हणून करण जोहरचा हा पहिलाच सिनेमा होता. परंतु या सिनेमातील पहिलाच सीन करणला काढावा लागला होता. सिनेमाची सुरुवात एका डेंटिस्टच्या क्लिनिकपासून होणार होती. त्यानंतर कोई मिल गया या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले. या गाण्यापासून सिनेमाची सुरुवात कर असा सल्ला शाहरुखने करणला दिला होता. हा सल्ला अमलात आणण्यात आला. डेंटिस्ट क्लिनिकचा सीन मी अंत्यत वाईट पद्धतीने दिग्दर्शित केला होता. अशी कबूली खुद्द करण जोहरने एका मुलाखती दरम्यान सांगितले.

 
 

हिरोईन मिळणे झाले होते मुश्किल!

 
 

 
 

या सिनेमातील टीनाच्या भूमिकेसाठी तब्बल आठ अभिनेत्रींनी नकार दिला होता. आता ऐनवेळी हिरोईन आणणार कुठून? स्क्रीप्टही बदलता येणार नव्हती, अशाप्रकारे करणची चांगलीच पंचाईत झाली होती. आदित्य चोप्रा आणि शाहरुख या दोघांनीही टीनाच्या भूमिकेसाठी राणी मुखर्जीचे नाव सुचवले. पण राणी त्यावेळी गुलाम सिनेमाच्या चित्रिकरण करत होती. करण घाबरतच राणीकडे याबाबत विचारण्यास गेला. पण राणीने करणची अडचण समजून घेत या भूमिकेसाठी होकार दिला. सिनेमातील काजोलने साकारलेली अंजलीची भूमिका जितकी प्रसिद्ध झाली. तितकीच राणीने साकारलेली टीनादेखील प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121