अवघी दुमदुमुली रहनाळ नगरी

    06-Jul-2025   
Total Views | 12

कल्याण : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचा गजर करत "पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला चा गजर करत शेकडो पावलं टाळ, मृदुंगाच्या ठेक्यावर थिरकत कल्याण नजीकच्या राहनाळ गावातून पांडुरंगाच्या दर्शनासाठी रॅली निघाली होती. एवढेच नव्हे तर या वारीमध्ये नवभारत साक्षरतेचा गजरही करण्यात आला.

जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थी वारीमध्ये सहभाग घेतला होता. पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या राजश्री पाटील यांनी गायलेल्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. मुलींनी आणि मुलांनी फुगडीचा फेर धरला. पालक रजनी नाईक, यांनीही ठेका धरला. ईश्वरी नाईक ही रुक्मिणी झाली, तर मनीष हा पांडुरंग झाला होता. वारकऱ्यांच्या वेशामध्ये पहिली ते सातवीचे विद्यार्थी खुलून दिसत होते. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने निघालेली वारी संपूर्ण राहनाळ गावातील ग्रामस्थांचे आकर्षण ठरली. रवीना पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांकडून नृत्य बसवून घेऊन सादर केली.

सर्व सामान्यांचा देव पांडुरंग आणि आषाढी एकादशीचे महत्त्व अंकुश ठाकरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं. तर नवभारत साक्षरतेची निघालेली वारी नेत्रदीपक आहे अशी भावना विषयतज्ञ शैलेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. आषाढी एकादशीच्या वारीत विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, पालक यांनीही फुगडीचा फेर धरून आनंद लुटला. ही वारी जन्मात एकदा तरी आम्हाला घडावी अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या.



'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121