पाकिस्तानची संपूर्ण व्यवस्था दहशतवादावर आधारलेली! सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचा बुरखा फाडला

    28-May-2025
Total Views | 16
India is against terrorism

सिंगापूर : पाकिस्तानची संपूर्ण यंत्रणा ही दहशतवादावर आधारलेली आहे. ते दहशतवाद्यांचे आश्रयदाते आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या उपद्रवाचा वापर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करतात. मात्र, याउलट भारताची भूमिका स्पष्ट आहे. भारत जबाबदार देश आहे. आम्ही दहशतवादाबद्दल एक ठाम भूमिका घेत कायमच विरोध केला आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद आम्हाला मान्य नाही, अशी ठोस भूमिका जनता दल युनायटेड (जेडीयू) खासदार यांनी सिंगापूरमध्ये मांडली. ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारताची भूमिका पोहोचविणाऱ्या शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी हे भाषण दिले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी अभिषेक बॅनर्जी यांनी सिंगापूरमध्ये भारताचे धोरण समजावून सांगितले. ते म्हणाले, “आम्ही दहशतवादाबद्दलची आमची भूमिका कधीही बदलणार नाही. आम्ही दहशतवादाचा कायम निषेध करतो.” या दरम्यान भारतीय शिष्टमंडळाने जकार्तामध्ये काओ किम होर्न यांचीही भेट घेतली. या भेटीत भारत आणि आसियान देशांमधील सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. विशेषतः दहशतवाद, सुरक्षा, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात दोन्ही बाजूंनी सहकार्य वाढवण्याची इच्छा व्यक्त झाली.

या शिष्टमंडळाचे प्रमुखपद खासदार संजय झा यांच्याकडे होते. ते म्हणाले, “भारत आणि आसियान यांच्यातील संबंध जूने आहेत. आम्हाला हे संबंध आणखी मजबूत  करायचे आहेत. जगातील दहशतवादाला ठेचण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवे. तेव्हाच आपले लक्ष्य साध्य होईल. पाकिस्तानची संपूर्ण व्यवस्था दहशतवादावर टीकून आहे. पाकिस्तानच्या पूर्ण सैन्याचा आधारच दहशतवाद आहे. पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते आणि भारतविरोधात कारवायांसाठी पाठवते. पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला बळ देत आहे. आम्ही त्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होऊ देणार नाही. ”

ऑपरेशन सिंदूरवर ते म्हणाले की, “आम्ही ऑपरेशन सिंदूर रातोरात राबवले. याचेही पाकिस्तान भांडवल करत आहे. पाकिस्तानी नागरिकांना कुठल्याही प्रकारे नुसकान पोहोचू नये, अशी आमची या मागची भावना होती. आमचे लक्ष्य पाकिस्तानी दहशतवाद्यांना उध्वस्त करणे होते. यासाठीच आम्ही रात्रीची वेळ निवडली होती.”

या संपूर्ण दौऱ्यात भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली भूमिका ठामपणे मांडली. दहशतवादासारख्या मुद्द्यावर भारताने परत एकदा जागतिक स्तरावर आपला हशतवादाला शून्य पाठींबा असल्याचे स्पष्ट केले. संजय झा यांच्या संपूर्ण दौऱ्यात सर्वपक्षीय प्रतिनिधींमध्ये भाजप खासदार प्रदन बरूआ, बृज लाल, डॉ. हेमांग जोशी, अपराजीता सारंगी, तृणमुल काँग्रेस खासदार अभिषेक बॅनर्जी, सीपीआय (एम) खासदार जॉन ब्रिटास आणि माजी राजदूत मोहन कुमार यांचा सामावेश आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ 16 जून रोजी पालघर जिल्हयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121