पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी महाराष्ट्रातील 'या' खासदारांवर महत्वाची जबाबदारी!

    17-May-2025
Total Views | 61
 
Shrikant Shinde & Supriya Sule
 
मुंबई : ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी भारतातील खासदारांची विशेष टीम परदेशात जाणार आहे. यासाठी विविध पक्षांच्या खासदारांची एक टीम गठित करण्यात आली असून ते जगासमोर आपली भूमिका मांडणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील काही खासदारांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 
मे महिन्याच्या अखेरीस ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सततच्या लढाईच्या संदर्भात सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देणार आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळे भारताच्या राष्ट्रीय सहमती आणि सर्व प्रकारच्या प्रकटीकरणातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ दृष्टिकोन मांडतील. ते दहशतवादाविरुद्ध शून्य-सहिष्णुतेचा देशाचा मजबूत संदेश जगासमोर माडणार आहेत.
 
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला घेरण्यासाठी भारताने हालचाली सुरु केल्या असून त्यासाठीते हे पहिले पाऊल असेल. दरम्यान, सर्वपक्षीय खासदारांचे सात शिष्टमंडळ परदेशात पाठवण्यात येणार असून प्रत्येक टीममध्ये ५ खासदार असतील. विविध पक्षांचे खासदार आणि प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वे प्रत्येक शिष्टमंडळाचा भाग असतील. शनिवारी या टीममधील नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार श्रीकांत शिंदे जगासमोर भारताचे नेतृत्व करणार आहेत.
 
शिष्टमंडळातील खासदारांची नावे पुढीलप्रमाणे :
 
१) शशी थरूर, काँग्रेस
२) रविशंकर प्रसाद, भाजप
३) संजय कुमार झा, जेडीयू
४) बैजयंत पांडा, भाजप
५) कनिमोझी करुणानिधी, द्रमुक
६) सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी
७) श्रीकांत एकनाथ शिंदे, शिवसेना
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121