पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी महाराष्ट्रातील 'या' खासदारांवर महत्वाची जबाबदारी!
17-May-2025
Total Views | 61
मुंबई : ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी भारतातील खासदारांची विशेष टीम परदेशात जाणार आहे. यासाठी विविध पक्षांच्या खासदारांची एक टीम गठित करण्यात आली असून ते जगासमोर आपली भूमिका मांडणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातील काही खासदारांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मे महिन्याच्या अखेरीस ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सततच्या लढाईच्या संदर्भात सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देणार आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळे भारताच्या राष्ट्रीय सहमती आणि सर्व प्रकारच्या प्रकटीकरणातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दृढ दृष्टिकोन मांडतील. ते दहशतवादाविरुद्ध शून्य-सहिष्णुतेचा देशाचा मजबूत संदेश जगासमोर माडणार आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला घेरण्यासाठी भारताने हालचाली सुरु केल्या असून त्यासाठीते हे पहिले पाऊल असेल. दरम्यान, सर्वपक्षीय खासदारांचे सात शिष्टमंडळ परदेशात पाठवण्यात येणार असून प्रत्येक टीममध्ये ५ खासदार असतील. विविध पक्षांचे खासदार आणि प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वे प्रत्येक शिष्टमंडळाचा भाग असतील. शनिवारी या टीममधील नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार श्रीकांत शिंदे जगासमोर भारताचे नेतृत्व करणार आहेत.