मुंबई: ( Pushkar Kumbh Mahotsav ) भारतातील पहिले सीमावर्ती गाव ओळखल्या जाणार्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ धाम या तीर्थस्थानाजवळ असलेल्या माणा येथील केशव प्रयाग येथे 12 वर्षांनंतर पुष्कर कुंभ महोत्सवाला पूर्ण उत्साहात नुकतीच सुरुवात झाली. त्यामुळे बद्रीनाथ धाम तसेच माणा गावात मोठ्या संख्येने यात्रेकरूंची रेलचाल वाढली आहे. पुष्कर कुंभच्या आयोजनासाठी, जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनासह येथील यात्रेकरूंच्या सोयीसाठी चोख व्यवस्था केली आहे.
जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, “माणा गावातील केशव प्रयाग येथे आयोजित पुष्कर कुंभसाठी पादचारी मार्ग सुधारण्यात आला असून भाविकांच्या सोयीसाठी याठिकाणी विविध भाषांमधील माहिती फलक लावण्यात आले आहेत. यासोबतच, कुंभमेळा सुरळीत पार पडावा, यासाठी संगम नदीच्या काठावर ‘एसडीआरएफ’चे जवानही तैनात करण्यात आले.”
उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील माणा या सीमेवरील गावात 12 वर्षांनंतर पुष्कर कुंभाचे आयोजन केले जात आहे. धार्मिक परंपरेनुसार जेव्हा गुरू ग्रह दर 12 वर्षांनी मिथुन राशीत प्रवेश करतो, तेव्हा माणा गावात अलकनंदा आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर असलेल्या केशव प्रयाग येथे पुष्कर कुंभ आयोजित केला जातो. या कार्यक्रमात प्रामुख्याने दक्षिण भारतातील वैष्णव अनुयायी सहभागी होतात.
हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार अशी मान्यता आहे की, महर्षी वेद व्यास यांनी माणा गावाजवळील केशव प्रयाग येथे तपश्चर्या करताना हिंदू महाकाव्य ‘महाभारत’ रचले. असेही म्हटले जाते की, दक्षिण भारतातील महान आचार्य रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य यांनी याच ठिकाणी देवी सरस्वतीकडून ज्ञान प्राप्त केले होते. त्यामुळे, त्यांच्या पौराणिक परंपरा जपण्यासाठी, केशव बद्रीनाथ धामजवळील माणा गावात पोहोचतो आणि प्रयागमध्ये स्नान करतो आणि प्रार्थना करतो.
उत्तर-दक्षिण जोडणारा पुष्कर कुंभ
तीर्थक्षेत्रे ही केवळ आपल्या धार्मिक श्रद्धेची केंद्रे नाहीत, तर ती देशाच्या एकता आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहेत. वेगवेगळ्या ठिकाणांहून येणारे भाविक या ठिकाणी एकत्र येतात आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेची जाणीव करून देतात. त्याच क्रमाने, माणा गावात आयोजित पुष्कर कुंभ उत्तरेला दक्षिणेशी जोडत आहे.
- पुष्कर सिंग धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड