संजय गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांकडून समज!

    26-Apr-2025
Total Views | 63
 
Devendra Fadanvis Sanjay Gaikvad
 
पुणे : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, २६ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पुण्यातील कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पोलिसांबद्दल असे बोलणे योग्य नाही, असे मला वाटते. संजय गायकवाड यांना कडक समज द्यावी हे मी स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे. हे असे चालणार नाही आणि हे योग्य नाही. ते वारंवार असे बोलत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल," असा इशाराही त्यांनी दिला.
 
हे वाचलंत का? -  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडवर!
 
...तर ते १०० वर्षे मला मुख्यमंत्री ठेवतील!
 
मुख्यमंत्रीपदाबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावर उत्तर देताना ते म्हणाले की, "बावनकुळे साहेबांच्या हातात असले तर ते १०० वर्षे मला मुख्यमंत्री ठेवतील. त्यांच्या शुभेच्छा माझ्या चांगल्याकरिता आहे. राजकारणात भूमिका बदलत असतात ती फार दीर्घकाळ राहात नाही. त्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा आहे तेव्हा बदलेल."
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121