एसटीचे उत्पन्न वाढवण्याबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?

    11-Apr-2025
Total Views | 16
 
Ajit Pawar
 
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पूर्ण पगार मिळाला नसल्याने एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान, याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचे उत्पन्न वाढवण्याबाबत प्लॅन सांगितला. शुक्रवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "कोरोनाकाळातही एसटी महामंडळाला आम्ही बजेटमधून २५० ते ३०० कोटी रुपये देत होतो. आता महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत दिली आहे. अन्य घटकांनादेखील आपण सवलती देतो. सवलतींच्या रकमेची बजेटमध्ये तरतूद करत असतो. प्रताप सरनाईक आमचे सहकारी आहेत. त्यांनी कॅबिनेट आणि अर्थसंकल्पाच्यावेळी सांगितले. आम्ही काही ई व्हेईकल बसेस आणि काही सीएनजी बसेस घेण्याचे ठरवले आहे. देशात किंवा जगात सार्वजनिक वाहतूक सेवा कुठेही फायद्यात नसते अशी माझी माहिती आहे. शेवटी सर्वसामान्य माणसांना सार्वजनिक वाहतूक सेवेत किफायतशीर तिकीटाचे दर असले पाहिजे. त्यासाठी सगळेच सरकार प्रयत्न करत असून आमचाही तोच प्रयत्न आहे."
 
"अनेक बसस्थानकांच्या जागा मोक्याच्या आहेत. बीओटी तत्वावर त्या जागा देऊन त्यातून काही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्याकरिता ६० वर्षांसाठी करार करून त्यानंतर तो पुन्हा ३० वर्षांनी वाढवण्याची तरतूद करायची, असा प्रस्ताव ठेवणार आहोत," असेही त्यांनी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121