एसटीचे उत्पन्न वाढवण्याबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?

    11-Apr-2025
Total Views | 15
 
Ajit Pawar
 
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पूर्ण पगार मिळाला नसल्याने एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान, याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीचे उत्पन्न वाढवण्याबाबत प्लॅन सांगितला. शुक्रवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "कोरोनाकाळातही एसटी महामंडळाला आम्ही बजेटमधून २५० ते ३०० कोटी रुपये देत होतो. आता महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत दिली आहे. अन्य घटकांनादेखील आपण सवलती देतो. सवलतींच्या रकमेची बजेटमध्ये तरतूद करत असतो. प्रताप सरनाईक आमचे सहकारी आहेत. त्यांनी कॅबिनेट आणि अर्थसंकल्पाच्यावेळी सांगितले. आम्ही काही ई व्हेईकल बसेस आणि काही सीएनजी बसेस घेण्याचे ठरवले आहे. देशात किंवा जगात सार्वजनिक वाहतूक सेवा कुठेही फायद्यात नसते अशी माझी माहिती आहे. शेवटी सर्वसामान्य माणसांना सार्वजनिक वाहतूक सेवेत किफायतशीर तिकीटाचे दर असले पाहिजे. त्यासाठी सगळेच सरकार प्रयत्न करत असून आमचाही तोच प्रयत्न आहे."
 
"अनेक बसस्थानकांच्या जागा मोक्याच्या आहेत. बीओटी तत्वावर त्या जागा देऊन त्यातून काही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. त्याकरिता ६० वर्षांसाठी करार करून त्यानंतर तो पुन्हा ३० वर्षांनी वाढवण्याची तरतूद करायची, असा प्रस्ताव ठेवणार आहोत," असेही त्यांनी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121