छावाच्या क्लायमॅक्सवेळी हसणाऱ्या तरुणांना प्रेक्षकांनीच अद्दल घडवली

    04-Mar-2025
Total Views | 40

Laughing while Chhaava movie Climax

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chhaava movie Climax)
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाने एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडल्याचे पाहायला मिळतेय. चित्रपट संपल्यानंतर बाहेर येणाऱ्या बहुतांश प्रेक्षकांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले. मात्र चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनदरम्यान हसल्याबाबत आणि विनोद केल्याबद्दल पाच जणांना माफी मागायला लावल्याची घटना नवी मुंबई येथे घडली आहे. कोपरखैरणे परिसरातील बालाजी मूव्हीप्लेक्स चित्रपटगृहात ही घटना घडली असून सदर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.

हे वाचलंत का? : वक्फ बोर्डाने ओलांडली हद्द; आता शिवलिंगावर ठोकला दावा



छावा चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये औरंगजेब धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मरणयातना देतानाची दृष्ये दाखवली आहेत. औरंगजेबाने संभाजी महाराजांना धर्मातर करण्यास प्रवृत्त केले असतानाही महाराजांनी हिंदू धर्म सोडला नाही, असे विविध सिन चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये आहेत. यादरम्यान ही पाच जणं हसत असल्याचा आणि विनोद करत असल्याचा असा आरोप इतर प्रेक्षकांकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांची चूक सुधारण्याकरीता इतर प्रेक्षकांनी त्यांना गुडघे टेकून माफी मागायला लावली.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121