संजय राऊतांविरोधात महिलेचं ईडीला पत्र! जबाब बदलण्यासाठी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी

    31-Aug-2024
Total Views | 599
 
Sanjay Raut
 
मुंबई : उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात एका महिलेने ईडीला पत्र लिहिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पत्राचाळ घोटाळ्यातील साक्षीदार डॉ. स्वप्ना पाटकर यांना त्याचा जबाब बदलण्यासाठी सतत बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
 
 
 
स्वप्ना पाटकर यांनी २८ ऑगस्ट रोजी ईडीला हे पत्र लिहिले आहे. पत्राचाळ घोटाळ्याच्या तपासादरम्यान दिलेला जबाब बदलण्यासाठी आपल्याला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्रात त्यांनी संजय राऊतांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
 
हे वाचलंत का? -  धक्कादायक माहिती! 'मविआ'च्या काळात लॉकडाऊनमध्येही दररोज १०९ महिलांवर अत्याचार
 
स्वप्ना पाटकर आपल्या पत्रात म्हणाल्या की, "मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छिते की, या प्रकरणातील आरोपी आणि त्याचे दलाल गुंड हे साक्षीदाराला सतत धमकावत आहेत. मला सतत धमक्या दिल्या जात आहेत आणि जबाब बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. तपासादरम्यान दिलेल्या माझ्या जबाबानुसार, आरोपी संजय राऊत आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर काही जमिनी आणि मालमत्तेसाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे," असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड..

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121