ब्रिटीशांनी भारत एकसंध केला ही कल्पना मूर्खपणाची!

गोवा राज्यपाल पी.एस.श्रीधरन यांचे प्रतिपादन

    30-Aug-2024
Total Views | 53

Goa Governor

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Goa Governor Bridging South Conclave)
"ब्रिटीशांनी भारत एकसंध केला ही कल्पना मूर्खपणाची आहे. भारत नेहमीच एकसंध, प्राचीन आणि सदैव नूतनीकरण करणारा आहे.", असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल ॲड. पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले. गुरुवार, दि. २९ ऑगस्ट रोजी थिरुवनंतपुरम येथे आयोजित केसरीच्या ब्रिजिंग साऊथ कॉन्क्लेव्हदरम्यान ते बोलत होते.

हे वाचलंत का? : देश टिकवायचा असेल तर हिंदूत्व प्रबळ करावं लागेल

उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, धर्म हा राज्याचा पाया आहे या मताशी ब्रिटीश असहमत होते. भारताचा राष्ट्रवाद अध्यात्मिक आहे आणि तो अध्यात्मापासून रहित नाही. आपल्या एकतेचे बीज आपल्या विविधतेत आहे, ज्याचे पालनपोषण केले पाहिजे. त्यांनी निदर्शनास आणून दिलेली केरळची त्रुटी म्हणजे राष्ट्रवादावर चर्चा करण्यात अनास्था असलेले राज्य बनले आहे. येथे सकारात्मक हालचालींऐवजी नकारात्मक हालचाली सुरू आहेत.

प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी आपल्या मुख्य भाषणात सांगितले की, भारतीय ओळख आणि राष्ट्रवाद नसलेले केरळ हे धोकादायक आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी अनेक उदाहरणे आहेत. जिथे राष्ट्रवाद नष्ट झाला आहे, ती जागा आता भारताची राहिली नाहीत. अशा प्रकारचे कॉन्क्लेव्ह हे फुटीरतावादी शक्तींना दिलेले प्रत्युत्तर आहेत जे भारतीय सर्वकाही जबरदस्तीने उखडून टाकू पाहत आहेत.

लोकांमध्ये फूट पाडणे ही विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवरील रणनीती आहे आणि ब्रिजिंग साऊथ कॉन्क्लेव्ह हे याविरुद्ध संरक्षण असल्याचे माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले. यावेळी माजी राजदूत डॉ.टी.पी. श्रीनिवासन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केसरीचे मुख्य संपादक डॉ. एन.आर. मधू, डॉ.के.एन. मधुसूदनन पिल्लई आणि राणी मोहन दास हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड..

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121