ब्रिटीशांनी भारत एकसंध केला ही कल्पना मूर्खपणाची!

गोवा राज्यपाल पी.एस.श्रीधरन यांचे प्रतिपादन

    30-Aug-2024
Total Views | 51

Goa Governor

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Goa Governor Bridging South Conclave)
"ब्रिटीशांनी भारत एकसंध केला ही कल्पना मूर्खपणाची आहे. भारत नेहमीच एकसंध, प्राचीन आणि सदैव नूतनीकरण करणारा आहे.", असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल ॲड. पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले. गुरुवार, दि. २९ ऑगस्ट रोजी थिरुवनंतपुरम येथे आयोजित केसरीच्या ब्रिजिंग साऊथ कॉन्क्लेव्हदरम्यान ते बोलत होते.

हे वाचलंत का? : देश टिकवायचा असेल तर हिंदूत्व प्रबळ करावं लागेल

उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, धर्म हा राज्याचा पाया आहे या मताशी ब्रिटीश असहमत होते. भारताचा राष्ट्रवाद अध्यात्मिक आहे आणि तो अध्यात्मापासून रहित नाही. आपल्या एकतेचे बीज आपल्या विविधतेत आहे, ज्याचे पालनपोषण केले पाहिजे. त्यांनी निदर्शनास आणून दिलेली केरळची त्रुटी म्हणजे राष्ट्रवादावर चर्चा करण्यात अनास्था असलेले राज्य बनले आहे. येथे सकारात्मक हालचालींऐवजी नकारात्मक हालचाली सुरू आहेत.

प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी आपल्या मुख्य भाषणात सांगितले की, भारतीय ओळख आणि राष्ट्रवाद नसलेले केरळ हे धोकादायक आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी अनेक उदाहरणे आहेत. जिथे राष्ट्रवाद नष्ट झाला आहे, ती जागा आता भारताची राहिली नाहीत. अशा प्रकारचे कॉन्क्लेव्ह हे फुटीरतावादी शक्तींना दिलेले प्रत्युत्तर आहेत जे भारतीय सर्वकाही जबरदस्तीने उखडून टाकू पाहत आहेत.

लोकांमध्ये फूट पाडणे ही विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवरील रणनीती आहे आणि ब्रिजिंग साऊथ कॉन्क्लेव्ह हे याविरुद्ध संरक्षण असल्याचे माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले. यावेळी माजी राजदूत डॉ.टी.पी. श्रीनिवासन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केसरीचे मुख्य संपादक डॉ. एन.आर. मधू, डॉ.के.एन. मधुसूदनन पिल्लई आणि राणी मोहन दास हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121