नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन!

    26-Aug-2024
Total Views | 79
 
Vasant Chavan
 
नांदेड : काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून सोमवार, २६ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
काही दिवसांपासून वसंत चव्हाण यांची प्रकृती ठीक नव्हती. सुरुवातीला त्यांना नांदेडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान, सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले.
 
वसंत चव्हाण यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत त्यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला. वसंत चव्हाणांनी २००९ मध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दिला सुरुवात झाली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121