मुंबईतील सायन पूल अखेर २ वर्षासाठी बंद!

    26-Jul-2024
Total Views | 60
Sion Railway Over Bridge
 
मुंबई : दक्षिण मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरात ये-जा करण्यासाठी, विशेषत: वाहन चालकांसाठी महत्त्वपूर्ण असलेला सायन स्थानकातील ११० वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. वाहतूक प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी १ ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत हा पूल बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मुंबईने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये या पुलाला धोकादायक घोषित केले होता. पंरतु बोर्डच्या परिक्षा, लोकसभा निवडणुक,स्थानिक रहिवाशांचा विरोध यामुळे पूल पाडण्याचा निर्णय लांबणीवर पडला. दरम्यान वावाहतूक बंद असल्याच्या कालावधीत होणाऱ्या कामांचे वेळापत्रक तयार केले असून लवकरच पूलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे. तसेच पूल तोडल्याच्या कालावधीत वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग सुचवला जाणार आहे. या पूलाच्या तोडण्याच्या आणि पुनर्बांधणीच्या कामाला तीन महिन्याचा कालावधी लागणार असून दोन वर्ष काम पूर्ण होण्यासाठी लागणार आहेत. या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळते.
 
हा असेल पर्यायी मार्ग

डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवरून सायन ओव्हर ब्रिजच्या पश्चिम आणि पूर्वेकडून एलबीएस मार्ग किंवा संत रोहिदास रोडकडे वाहने वळवली जातील. यात सायन-महिम लिंक रोड,के.के.कृष्णन मार्ग,सायन हॉस्पिटल जंकश्नजवळील सुलोचना शेट्टी रोडचा ही वापर केला जाऊ शकतो.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121