नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी संसदेत खलिस्तानी अमृतपालचे समर्थन केले. चरणजीत सिंह चन्नी जालंधरमधून विजयी होऊन खासदार झाले आहेत, तर अमृतपाल सिंह खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून विजयी झाला आहे. अमृतपाल सिंगने तिथून काँग्रेस, भाजप, आप आणि अकाली दल या चार मोठ्या पक्षांचा पराभव केला. तो सध्या आसामच्या दिब्रुगड तुरुंगात बंद आहे. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.
चरणजितसिंग चन्नी अर्थसंकल्पावर आपले म्हणणे मांडण्यासाठी लोकसभेत उभे राहिले, पण खलिस्तानबाबतचे आपले आणि पक्षाचे मत त्यांनी सर्वांसमोर ठेवले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही केला. त्यावर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी चुकीच्या गोष्टी सांगून दिशाभूल केल्याचा आरोप केला. भांडवलदारांचे कर्ज माफ केले जात आहे, तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, असा आरोप त्यांनी केला.
यादरम्यान चरणजीत सिंह चन्नी यांनी अमृतपाल सिंगच्याबद्दल सांगितले की, "अमृतपाल यांना २० लाख लोकांनी खासदार म्हणून निवडून दिले आहे." चरणजित सिंह चन्नी म्हणाले की, ठअमृतपाल सिंग यांना एनएसए लावून आतमध्ये ठेवण्यात आले आहे, ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील लोकांचे मत व्यक्त करू शकत नाहीत. चन्नी यांच्या मते, हे ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’च्या विरोधात आहे."
चन्नी यांनी अमृतपालला पाठिंबा दिला आहे. अमृतपाल सिंग यांच्या अटकेला ते आणीबाणी म्हणत आहेत. नुकतेच अमृतपालचा भाऊ हरप्रीत आणि त्याचा मित्र लवप्रीत यांना ड्रग्जसह पकडण्यात आले होते. अमृतपाल सिंगने भारत देशाविरुद्ध युद्ध सुरू केल्याचा आरोप आहे. त्याने अनेकदा भारतातून पंजाबला वेगळं करत नवीन खलिस्तान देश बनवण्याचे वक्तव्य केलेले आहे.