बजेट न वाचताच विरोधकांची घोषणाबाजी! प्रतिक्रियाही आधीच ठरलेली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

    23-Jul-2024
Total Views | 26
 
Fadanvis
 
मुंबई : बजेट न वाचताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली असून काय प्रतिक्रिया द्यायची हेही त्यांचं आधीच ठरलेलं होतं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी बजेट न वाचता घोषणा दिल्या. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे त्यांना आधीच लिहून दिलेलं आहे. त्यांची प्रत्येकाची प्रतिक्रिया ठरलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा विनाकारण नरेटिव्ह तयार करण्यात येत आहे. पण केवळ नरेटिवकरिता राजकारण न करता आपल्या राज्याला काहीतरी मिळावं अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा," असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.
 
याशिवाय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी केलेल्या घोषणांची यादीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचून दाखवली. ती पुढीलप्रमाणे...
 
- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प : ६०० कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार : ४०० कोटी
- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर : ४६६ कोटी
- पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प : ५९८ कोटी
- महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : १५० कोटी
- MUTP-3 : ९०८ कोटी
- मुंबई मेट्रो : १०८७ कोटी
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर : ४९९ कोटी
- MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी : १५० कोटी
- नागपूर मेट्रो : ६८३ कोटी
- नाग नदी पुनरुज्जीवन : ५०० कोटी
- पुणे मेट्रो : ८१४ कोटी
- मुळा मुठा नदी संवर्धन : ६९० कोटी
 
या केवळ २ ते ३ विभागांच्या तरतुदी असून अजून बरेच काही या अर्थसंकल्पात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121