वक्फ बोर्डाची बंदी उठवण्याच्या मागणीखातर हजारो मुस्लिमांची निदर्शने!
11-Jul-2024
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : तमिळनाडूच्या (Tamilnadu Waqf Board) पेरांबलूर जिल्ह्यातील विविध गावांतील एक हजारहून अधिक मुस्लिमांनी मंगळवारी पेरांबलूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यांनी वक्फ बोर्डाची बंदी उठवण्याची मागणी केली, ज्यामुळे त्यांना १८ फेब्रुवारी २०२० पासून त्यांच्या मालमत्तेची नोंदणी करण्यापासून प्रतिबंधित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी सरकारकडे अनेक तक्रारी केल्या आहेत, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. ते आता वक्फ बोर्डाचे आक्षेप तात्काळ काढून टाकण्याची मागणी करत आहेत. योग्य आदेश न निघाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून प्रश्न सोडविण्याची विनंती केली आहे.