अजितदादांच्या आरोपानंतर रोहित पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले...

    29-Oct-2024
Total Views | 175

Rohit Patil


मुंबई :
अजितदादांच्या आरोपामुळे आमच्या कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना खूप वाईट वाटले आहे. आज आबा असते तर त्यांनी नक्कीच त्यांना उत्तर दिले असते, अशी प्रतिक्रिया आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात आर. आर. पाटलांवर जाहीर सभेत आरोप केले होते.
 
यासंदर्भात बोलताना रोहित पाटील म्हणाले की, "आबांना जाऊन आता नऊ वर्षे झाले आहेत. आज आबा असते तर त्यांनी या आरोपाचे उत्तर दिले असते. परंतू, आता त्यांच्या पश्चात दादांनी हे वक्तव्य का केलं, हे कळत नाही. अजितदादा वरिष्ठ आहेत. आम्ही दादांच्या नेतृत्वात काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर काही बोलणार नाही. परंतू, या वक्तव्यामुळे आमच्या कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना खूप वाईट वाटले आहे."
 
हे वाचलंत का? - भव्य शक्तीप्रदर्शन करत पराग शाह यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज!
 
अजित पवारांचे आरोप काय?
 
माझ्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्याची एक फाईल तयार झाली. ती फाईल गृहखात्याकडे जाते. आर. आर. आबा पाटलांनी अजित पवारांची खुली चौकशी व्हावी, यासाठी त्या फाईलवर सही केली. त्यांनी आपला केसाने गळा कापला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला होता.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121