विधानसभेवर पुन्हा महायुतीचा झेंडा फडकावणार!

देवेंद्र फडणवीसांनी दक्षिण-पश्चिम नागपूरमधून दाखल केला उमेदवारी अर्ज

    25-Oct-2024
Total Views |
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : विधानसभेवर पुन्हा महायुतीचा झेंडा फडकावणार, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पश्चिम नागपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीमध्ये नागपूरकर स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले.
 
नागपूरकरांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या नेतृत्वात नागपूर येथे शिक्षण संस्था, मेट्रोसारख्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. सर्वार्थाने नागपूर शहराचे चित्र बदलू शकलो ते नागपूरकरांच्या आशीर्वादामुळेच. याच आशीर्वादामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना वैनगंगा-नळगंगासारख्या दूरदर्शी प्रकल्पांमार्फत विदर्भाचे चित्र बदलू शकलो. महिला, शेतकरी, दीन-दलित, आदिवासी सर्वांसाठी काम करण्याची संधी मिळाली. ओबीसी समाजासाठी ४८ शासन निर्णय काढले, ५४ वसतिगृहे बनवली. दलित-आदिवासी समाजांसाठी 'स्वयं'सारखी योजना आणून शिक्षणाचे दालन सुरू केले. मा. पंतप्रधान मोदीजी यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणार्‍या नव-महाराष्ट्राची निर्मिती करतो आहे.
 
यावेळी त्यांनी कृष्णा खोपडे आणि मोहन मते यांनादेखील विक्रमी मताने विधानसभेत पाठवण्याचे आवाहन नागपूरकरांना केले. तसेच विधानसभेवर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकावणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय, सुलेखा कुंभारे, कृष्णा खोपडे, मोहन मते, कृपाल तुमाने, परिणय फुके, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृपाशंकर सिंह, अनिल सोले, आशिष जयस्वाल, विकास महात्मे, प्रवीण दटके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आचार्य पवन त्रिपाठी यांनी घेतली भेट
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नामांकन प्रक्रियेनंतर नागपुरातल्या त्यांच्या निवासस्थानी मुंबई भाजपचे उपाध्यक्ष तथा श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वाराणसीचे आमदार अवधेश सिंह उपस्थित होते. महाराष्ट्राच्या लोककल्याणासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा महाराष्ट्रातील जनतेचा निर्धार आहे, अशी प्रतिक्राय आचार्य त्रिपाठी यांनी दिली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121