रस्ता पाच वर्षांपूर्वी खराब झाला तर याद राखा; योगींचा कंत्राटदारांना इशारा!

    12-Sep-2023
Total Views | 42

Yogi Adityanath


मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येत्या नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
 
विविध विभागांची बैठक घेत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, यंदा पावसाची स्थिती खराब आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन येत्या नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी राज्यव्यापी खड्डेमुक्त रस्ते अभियान राबविण्यात यावे.
 
तसेच पुढे ते म्हणाले की, राज्यात वेगवेगळ्या विभागांचे जवळपास चार लाख किलोमीटरचे रस्ते आहेत. या प्रत्येक रस्त्यावरून चालणे हा सर्वसामान्यांसाठी आनंददायी अनुभव असावा ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे मेट्रो/एक्स्प्रेस वे सारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे पूर्वीचे रस्ते खराब झाल्यास संबंधित विभाग त्यासाठी जबाबदार असेल, असे ते म्हणाले.
 
तसेच रस्त्यांसाठी बजेटची कुठलीही कमतरता नसून सर्व विभागांनी व्यवस्थित नियोजन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच रस्ते बांधणीचे कंत्राट घेणारे कंत्राटदार आणि एजन्सी रस्त्याच्या बांधकामानंतर पुढील ५ वर्षे देखभालीची जबाबदारी घेतील याची खात्री करण्याच्या सुचनाही त्यांनी आपल्या विभागातील मंत्री आणि विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121