भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या शतकाचा 'असा'ही योगायोग!

    22-Jul-2023
Total Views | 60
Virat Kohli equals Don Bradman with sensational ton

मुंबई
: भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा कसोटी सामना त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळण्यात येत असून या सामन्यात भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीतले २९ वे शतक पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर ठोकले असून याआधी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनेही याच मैदानावर आपले २९ वे शतक ठोकले होते. त्यामुळे क्रिकेटविश्वात हा एक अनोखा योगायोगच म्हणावा लागेल. दरम्यान, क्रिकेटप्रेमींमध्ये याबद्दल चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा सामना विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला ५०० सामना आहे.

दरम्यान, विराट कोहलीने विंडीजविरुध्द खेळताना पहिल्या डावात शतकी खेळी केली असून १२१ धावा करून तो धावबाद झाला. दरम्यान, भारतसाठी सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहलीने आगेकूच केली असून तो आता चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत २९ शतके असून गावस्कर, द्रविड, तेंडुलकर अनुक्रमे ३४, ३६ , ५१शतकांसह त्याच्यापुढे आहेत. दरम्यान, विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या महान आणि क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली, ज्यांनी आपल्या शानदार कारकिर्दीत २९ कसोटी शतकेही झळकावली होती.

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यास विलंब होणार असून पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताने आपला पहिला डाव ४३८ धावांवर आटोपला असून विंडीजने पहिल्या डावास सुरुवात केली असून १ गडी बाद झाला असून ८६ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून ब्रेथवेट आणि मॅकेंझी खेळत असून ३५२ धावांनी विंडीज अद्याप पिछाडीवर आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121