पुण्यात लाकूड बाजारातील गोदामाला भीषण आग

    25-May-2023
Total Views | 98
Bhawani Peth Pune fire

पुणे
: पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या लाकूड बाजारातील (टिंबर मार्केट) एका गोदामाला पहाटे सव्वाचारच्या सुमारास आग लागली. बघता बघता ही आग पसरली आणि सात ते आठ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेत दुकानांचे आणि आसपास राहणार्‍या नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. संसार आणि व्यवसायाचा अक्षरश: कोळसा झाल्याचे विदारक दृश्य याठिकाणी दिसत होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझविण्यात यश आले.

भवानी पेठ परिसरात पुण्यातील सर्वात मोठा लाकूड बाजार आहे. याठिकाणी लाकडांची मोठ मोठी दुकाने आणि गोदामे आहेत. अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारातील रामोशी गेटजवळील एका गोदामाला पहाटे आग लागली. गोदामात सर्व लाकडी साहित्य असल्याने आग वेगाने पसरली. पाहता पाहता ही आग आसपासच्या दुकानांना जाऊन भिडली. पाहता पाहता आगीने विक्राळ स्वरुप प्राप्त केले. घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिका, पुणे कॅन्टोमेंट बोर्ड आणि पीएमआरडीएच्या एकूण अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान घटनास्थळी प्रत्यक्ष काम करीत होते.

पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. या दुकानांशेजारील चार घरांनाही आगीने वेढले. घरातील सामान तिथेच सोडून नागरिक जीव वाचवित घराबाहेर पळाले. संसारोपयोगी साहित्य, पैसे, कपडे, महत्वाची कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी उपाययोजना करीत ही आग वस्तीमध्ये आणि शाळेमध्ये पसरु दिली नाही. धावपळ करीत युद्ध पातळीवर विविध घरांमधील दहा सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

अग्रलेख
जरुर वाचा
धारावीमधील मुले शाळा का सोडतात? गरिबी आणि जागरूकतेचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांची गळती

धारावीमधील मुले शाळा का सोडतात? गरिबी आणि जागरूकतेचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांची गळती

भारतामधील सर्वाधिक साक्षर झोपडपट्टीपैकी एक असलेल्या धारावीत शालेय विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचे आव्हान आहे. राज्य शासन आणि विविध स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील असताना गरिबी, असुरक्षित वातावरण, खराब आरोग्य आणि शिक्षणाविषयी जागरूकतेचा अभाव यामुळे अनेक मुले वेळेपूर्वीच शिक्षणव्यवस्थेच्या बाहेर पडत आहेत. “या शैक्षणिक वर्षातच, १०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमधून शाळा सोडली असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे,” असे गांधी मेमोरियल शाळेचे मुख्याध्यापक जे. चेल्लादुराई यांनी सांगितले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121