मविआची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ : नारायण राणे

    21-May-2023
Total Views | 60
Narayan Rane on Mahavikas Aghadi

मुंबई : महाविकास आघाडीत आतापासूनच लोकसभेच्या जागावाटपावरून वाद सुरु झाले असून त्यांची अवस्था म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे. आपले राजकीय मूल्य किती? आपल्या पक्षाचे बळ किती राहिले आहे? याचा अंदाज न घेता विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, अशी टीका 'दै.मुंबई तरूण भारत' मुलाखत देताना नारायण राणेंनी केली आहे.

महाराष्ट्रतील राजकीय परिस्थिती बद्दल बोलताना राणे म्हणाले की, विरोधक जे वातावरण निर्माण करू पाहत आहेत, त्यामागे सत्ता गेल्यामुळे आलेले नैराश्य आणि कमी होत जाणारा लोकांचा पाठिंबा, झालेले खच्चीकरण यामुळे महाविकास आघाडीकडून बेछूट आरोप करून सरकारला बदनाम केले जात आहे. पण या बदनामीमुळे भाजपवर काहीही परिणाम होणार नाही.आज देशात भाजपचे 302 खासदार आहेत, तर राज्यात शिवसेना-भाजपचे बहुमताचे सुरक्षित सरकार असून, हे सरकार 2024 पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण होणार हा विश्वास आहे. सरकारच्या स्थिरतेविषयी टीकाटिप्पणी करणारी मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. मुळात सरकार आणि फडणवीस, शिंदेंवर आरोप करणार्‍यांचे आपल्या मतदारसंघात आणि एकूण महाराष्ट्रात काम किती आहे, याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे, असे ही राणे म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा
विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली अहमदाबाद विमान दुर्घटना : पार्थिवावर राजकोट येथे अंत्यसंस्कार; ३२ जणांचे डीएनए जुळले

विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली अहमदाबाद विमान दुर्घटना : पार्थिवावर राजकोट येथे अंत्यसंस्कार; ३२ जणांचे डीएनए जुळले

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा दि. १२ जून रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला होता. तीन दिवसांनंतर डीएनए चाचणीमुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. विजय रुपाणींचा डीएनए जुळला असल्याची माहिती रुग्णालयाने रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ११.१० वाजता दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाकडे दिले. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट ..

धर्मांधांनी मंदिराबाहेर फेकले गोमांसाचे तुकडे; मुख्यमंत्र्यांनी दिले

धर्मांधांनी मंदिराबाहेर फेकले गोमांसाचे तुकडे; मुख्यमंत्र्यांनी दिले 'Shoot at Sight'चे आदेश

आसाममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून इस्लामिक कट्टरपंथी हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिर परिसरात वारंवार गोमांस फेकून हिंदूंच्या श्रद्धेची खेळण्याचा प्रयत्न होतो आहे. आसामच्या लखीपूर येथील काली मंदिराजवळ गोमांस फेकण्याची घटना घडल्याने परिसरात जातीय तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी आसाममधील धुबरीमध्येही असाच काहीसा प्रकार घडला होता. त्यामुळे स्थानिक हिंदूंमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी सुद्धा आरोपींना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिलेत...

अमेरिकेवर हल्ला केल्यास वाईट परिणाम होतील डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; इस्रायलकडून तीव्र प्रत्युत्तर

अमेरिकेवर हल्ला केल्यास वाईट परिणाम होतील डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; इस्रायलकडून तीव्र प्रत्युत्तर

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. इस्रायलने केवळ इराणच्या अणू ठिकाणांवर हल्ले केले नाहीत, तर नऊ शास्त्रज्ञांनाही ठार केले आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, "इराणवर झालेल्या ताज्या इस्रायली हल्ल्यांमध्ये अमेरिकेची काहीही भूमिका नव्हती. पण, इराणने अमेरिकेवर हल्ला केला, तर आमचे लष्कर संपूर्ण ताकदीने त्याच्यावर तुटून पडेल. ही कारवाई अशी असेल, जिचा विचार इराणने कधीच केला नसेल.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट शेअर केली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121