देशात पुन्हा आणीबाणी लादण्याची काँग्रेसची भाषा! रा.स्व.संघाविरोधात प्रियांक खरगेंचे वादग्रस्त विधान

    01-Jul-2025   
Total Views |

मुंबई  : 'जर केंद्रात कांग्रेसची सत्ता आली तर संघावर पुन्हा बंदी घातली जाईल', असे वादग्रस्त विधान करत देशात पुन्हा आणीबाणी लादण्याची भाषा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचे चिरंजीव आणि कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियांक खरगे यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाच्या विरोधात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

संघाची विचारसरणी समानता आणि आर्थिक समतेच्या विरोधात असल्याचे वर्णन करत ते म्हणाले की, "काँग्रेस सुरुवातीपासूनच संघाच्या तत्वांना विरोध करते आणि भविष्यातही करत राहील. काँग्रेसने यापूर्वी दोनदा संघावर बंदी घातली होती आणि त्यांना बंदी उठवल्याबद्दल पश्चात्ताप झाला. त्यामुळे भविष्यात काँग्रेसची पुन्हा सत्ता आली तर संघावर पुन्हा बंदी घातली जाईल."

खरंतर १९७५ मधील आणीबाणी भारताच्या आत्म्यावर झालेला आघात होता. मात्र त्या अंधकारमय काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ठरली, ज्याने लोकशाहीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. हजारो स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे अटक करवून घेतली. काहींनी भूमिगत राहून सत्याचे बीज पेरले. हा संघर्ष सत्तेसाठी नव्हता, तर संविधान, स्वातंत्र्य आणि राष्ट्रधर्म यांच्यासाठी होता. हा इतिहास आपल्या लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या शूर निष्ठावंतांचा आहे, त्यामुळे तो कधीही विसरला जाऊ शकत नाही.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

"राज्य सरकार मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असुन प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. याॲपला जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेने हे शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121