पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द! पुढच्या तीन दिवसांत भारत सोडण्याचे आदेश

    24-Apr-2025
Total Views | 24
 
Visa
 
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून पुढील तीन दिवसात भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.
 
केंद्र सरकारने गुरुवार, २४ एप्रिल रोजी पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिले असून येत्या २७ एप्रिलपर्यंत त्यांना भारत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मेडिकल व्हिसाची मुदत २९ एप्रिलपर्यंत वैध ठेवण्यात आली आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्यानुसार, भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर देश सोडून जावे लागणार आहे.
 
 हे वाचलंत का? - दहशतवाद्यांसमोर अजाण म्हटली, कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या...! कौस्तुभ गणबोटेंच्या नातेवाईकांनी सांगितली आपबिती
 
पहलगाम येथे झालेल्या इस्लामी दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवार, २३ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची (सीसीएस) तातडीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.
 
१. १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित.
२. अटारी एकात्मित तात्काळ प्रभावाने बंद. वैध मान्यतांसह ज्यांनी त्या मार्गाने ओलांडले आहे ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.
३ पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भूतकाळात जारी केलेले कोणतेही एसपीईएस व्हिसा रद्द मानले जातील. त्याअंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत.
४. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागारांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत.
५. भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार मागे घेणार. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातील.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
घरफोडी, चोरीसह सुमारे १५ गुन्हे, कोण होता हत्या झालेला झुंडचा अभिनेता?

घरफोडी, चोरीसह सुमारे १५ गुन्हे, कोण होता हत्या झालेला झुंडचा अभिनेता?

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटात काम केलेल्या एका कलाकाराची निर्घृण हत्या झाली आहे. मंगळवारी मध्यरात्री ही हत्या झाली असून सध्या या प्रकरणाची बरीच चर्चा आहे. प्रियांशू छेत्री असं हत्या झालेल्या कलाकाराचं नाव आहे. झुंडमध्ये प्रियांशू उर्फ बाबूने लहानशी भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी नागराजने तळागाळातील कलाकारांची निवड केली होती. त्यातीलच एक प्रियांशू होता. त्याने अमिताभ बच्चनसोबतही भूमिका साकारली होती. तो फूटबॉल पटू देखील होता पण कायमच तो गुन्हेगारीमुळे क्षेत्रात वावरत होता. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121