मस्साजोग प्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

    26-Feb-2025
Total Views |
 
Ujjwal Nikam
 
मुंबई : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली.
 
माध्यमांशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, "माझ्या नियुक्तीकरिता मस्साजोगचे ग्रामस्थ सातत्याने मागणी करत होते. तसेच त्यांनी काल अन्नत्याग आंदोलन सुरु केले हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो. त्यामुळे मी हा खटला चालवण्यासाठी तयार असल्याचे काल मुख्यमंत्र्यांना कळवले. त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केले आहेत."
 
हे वाचलंत का? -  राज्यातील सर्वच जात पडताळणी समितींना मिळाले अध्यक्ष!
 
ग्रामस्थांनी उपोषण सोडावे
 
"मस्साजोगच्या सर्व ग्रामस्थांनी उपोषण सोडावे. या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे. त्यामुळे आपल्या तब्येतीला त्रास होईल असे कुठलेही कृत्य ग्रामस्थांनी करू नये. त्यांनी उपोषण थांबवावे. या खटल्यातील तपास यंत्रणा जेव्हा आरोपपत्र दाखल केल्यानंतर आम्ही हा खटला तातडीने चालवण्यासाठी घेऊ," असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.
 
विरोधकांच्या गाऱ्हाण्याला महत्व देत नाही
 
"माझ्या नियुक्तीचे राजकीय पडसाद उमटतीला याची मला पूर्वीच कल्पना होती. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांनादेखील हे सांगितले होते. पण यापूर्वीदेखील विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते, असे मला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले. मी यापूर्वी कधीही राजकारण सक्रीय नव्हतो आणि मी राजकारणात असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुणीही आडवे येऊ शकत नाही. त्यामुळे मी त्याच जोमाने चालत राहील. विरोधकांच्या गाऱ्हाण्याला मी महत्व देत नाही. कारण केवळ विरोधासाठी विरोध करणे हा सध्या त्यांचा स्थायी स्वभाव आहे," असेही उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ 16 जून रोजी पालघर जिल्हयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121