धक्कादायक! आम आदमी पक्षाचा आणखी एक घोटाळा समोर

दिल्लीच्या हाउसिंग स्कीममधील भ्रष्टाचार उघड!

    13-Jan-2025
Total Views | 64

aap 22

नवी दिल्ली : "आम आदमी पक्षाचे सरकार दिल्लीमध्ये सत्तेत असताना हाउसिंग स्कीमच्या माध्यमातून त्यांनी झोपडीत राहणाऱ्या लोकांकडून लाखो रूपये उकळले. त्यांना राहायाला पक्कं घर मिळेल असं खोटं आश्वासन दिलं. परंतु आपच्या नेत्यांनी या गरिबांना फसवलं असून त्यांचे पैसे लुबाडले" असा आरोप भाजपनेते पर्वेश वर्मा यांनी केला आहे. १३ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत बोलताना पर्वेश वर्मा यांनी दिल्लचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपच्या पर्वेश वर्मा यांनी आप चा अजून एक घोटाळा जगासमोर आणला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की आम आदमी पक्षाने सार्वजनिक व्यवस्थापूर्णपणे बिघडवली आहे. दिल्लीमध्ये राहणारे नागरिक विशेषत: झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची केजरीवालांनी दिशाभूल केली आहे. मला केजरीवालांना विचारायचं आहे की गरिबांची घरं उद्धवस्त करून स्वत:साठी शीशमहाल कोण बनवतं आहे ? असा प्रश्न वर्मा यांनी विचारला. केजरीवाल जर का आपलं वचन पूर्ण करू शकत नसतील तर त्यांनी निवडणूक लढवू नये असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. सदर पत्रकार परिषदेत झोपडपट्टींमध्ये राहणारे अनेक रहिवासी उपस्थित होते. वर्मा यांनी माहिती कायद्यांतर्गत सगळे पुरावे सादर केले. दिल्ली सरकारने झोपडीत राहणाऱ्या लोकांकडून पैसे घेतले परंतु वचन दिल्याप्रमाणे फ्लॅट्स दिलेले नाही. आम आदमी पक्षाच्या आख्त्यारीत असलेल्या नगरपालिकाने झोपड्या हटवण्याचे काम केले परंतु योग्य नागरिकांना घरं दिली नाहीत असा आरोप पर्वेश वर्मा यांनी केला.

 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121