नोकरभरतीचा विक्रम! दोन वर्षात १ लाख तरुणांना सरकारी नोकरी

    03-Jul-2024
Total Views | 74
 
Fadanvis
 
मुंबई : दोन वर्षात १ लाख तरुणांना सरकारी नोकरी देऊन आम्ही नोकरभरतीचा विक्रम केला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी सभागृहात दिली. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या सरकारने पारदर्शीपणे नोकरभरती करुन रेकॉर्ड तयार केला आहे. आम्ही ७५ हजार नोकरभरतीची घोषणा केली होती. ५७ हजार ४५२ लोकांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत. १९ हजार ८५३ लोकांची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढच्या एक महिन्यात त्यांच्या हातात नियुक्ती आदेश जाणार आहे. याचाच अर्थ आतापर्यंत ७७ हजार ३०५ लोकांना नोकरी देण्यात आली आहे. याशिवाय ज्यावर कारवाई सुरु आहे अशी ३१ हजार २०१ पदं आहेत. त्यामुळे दोन वर्षाच्या काळात १ लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचा विक्रम या सरकारने केला आहे."
 
हे वाचलंत का? -  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'त अडथळा आणल्यास कठोर कारवाई होणार!
 
या अधिवेशनात पेपरफूटीचा कायदा आणू!
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, "साधारणपणे आपण जवळपास ७० लाख विद्यार्थ्यांची परिक्षा घेतली असून यात एकही पेपरफूटीची घटना घडली नाही. या सरकारने पारदर्शी परिक्षा घेतल्या आहेत. परिक्षेतील गैरप्रकारांच्या विरोधात आम्ही एक कायदा तयार करणार असून याच अधिवेशनता हा कायदा आणणार आहोत. याशिवाय नमो महारोजगार मेळावा आपण घेतला. खाजगी क्षेत्रात सुद्धा मोठया प्रमाणावर रोजगार मिळाले. नागपूर, पुणे, ठाणे असे अनेक ठिकाणी असे मेळावे घेण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली," असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121