राज्यात सरासरीच्या 123 टक्के पाऊस

पेरण्या समाधानकारक

    24-Jul-2024
Total Views | 45
 
Perni
 
मुंबई : राज्यात सरासरीच्या 123.2 टक्के पाऊस झाला असून पेरण्यादेखील समाधानकारक झाल्या आहेत. या संदर्भातील सादरीकरण मंगळवार, दि. 23 जुलै रोजी कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले. राज्यात दि. 22 जुलैपर्यंत 545 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच सुमारास 422 मिमी म्हणजेच सरासरीच्या 95.4 टक्के पाऊस झाला होता.
 
राज्यात खरीपाचे ऊस वगळून 142.2 लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत 128.94 लाख हेक्टर क्षेत्रावर (91 टक्के) पेरणी झाली आहे. भात व नाचणीपिकाची पुनर्लागवड कामे सुरू असून ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग आणि कापसाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. खत आणि बियाणांची पुरेशी उपलब्धता आहे.
 
पाणीसाठा किती आहे?
सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये 39.17 टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 43.65 टक्के पाणीसाठा होता. सर्वात कमी म्हणजे 12.13 टक्के पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर येथे, तसेच 28.34 टक्के नाशिक येथे आहे. राज्यातील 1 हजार, 21 गावे आणि 2 हजार, 518 वाड्यांना 1 हजार, 365 टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकर्सची संख्या 326ने वाढली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121