काँग्रेसला हरवणे हाच आणीबाणीचा निषेध : राम नाईक

    25-Jun-2024
Total Views | 43
Ram Naik on congrees
मुंबई : “आणीबाणीच्या कालावधीत मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागांसाठी लागलेल्या निवडणुकीत भारतीय जनसंघाचे उमेदवार डॉ. वसंत कुमार पंडित आणि प्रा. कानिटकर यांचा दणदणीत विजय झाला. त्यावेळी मुंबईतील पदवीधरांनी काँग्रेसच्या आणीबाणीच्या निर्णयाविरोधात मतदान केले. त्यामुळे ज्यांनी आणीबाणी देशावर लादली, त्यांचे आजही वर्तन बदलेले नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक निवडणुकीत हरवणे हाच मार्ग आहे,” असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केले. याबरोबरच पदवीधर निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजप मुंबई कार्यालय, वसंतस्मृती येथे बुधवार, दि. 25 जून रोजी ’आणीबाणी आणि लोकशाहीची हत्या’ या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.


नाईक पुढे म्हणाले की, ”49 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा केली. परंतु, त्या आणीबाणीचा शेवट इंदिरा गांधींच्या पराभवाने झाला. त्यावेळी संपूर्ण देशात भारतीय जनसंघ, रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना आणीबाणीला विरोध केल्यामुळे अटक करण्यात आली.” जवळपास एक लाख लोकांना आणीबाणीच्या काळात अटक करण्यात आली होती. मात्र, वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली, अशा अनेक आठवणींचा पट त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला.

आम्हाला संविधानाची प्रत दाखविणे हा राहुल गांधींचा बालिशपणा


कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, ”ज्यांनी संविधानातील मुल्यांची पायमल्ली केली, तेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज आम्हाला संविधानाची प्रत दाखवत आहेत. तो त्यांचा बालिशपणा आहे. काँग्रेसचा अहंकार तेव्हाही आणि आजही कायम आहे. जेवढा अपमान इंदिरा गांधींच्या पापी काँग्रेसने संविधानाचा केला, तेवढा आजवर कोणीच केला नाही. देशाच्या स्वातंत्र्याचे पहिले आंदोलन इंग्रजांविरोधात होते, तर दुसरे आंदोलन काँग्रेसविरोधात होते. इंदिरा गांधी काँग्रेसप्रती इंग्रजांसारखे वागले,” अशी टीका ही त्यांनी केली.

तसेच, “संविधानावर गप्पा मारणार्‍या काँग्रेसने आणीबाणी लादून संविधानाचा अपमान केला होता, हे विसरू नये. तो दिवस आठवला, तर आजही अंगावर काटा येतो. मात्र, आता तशी परिस्थिती पुन्हा कधीच निर्माण होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सुरक्षित आहे,” असे विधान या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या नफिसा मुजफ्फर हुसैन यांनी केलेे. या कार्यक्रमात भाजप महामंत्री संजय उपाध्याय, ज्येष्ठ नेते मधु चव्हाण, कांताबाई नलावडे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्तापिपासू महिलेने लोकशाहीला नख लावण्याचे काम केले

सत्तापिपासू महिलेने दि. 25 जून 1975 रोजी भारताच्या लोकशाही मुल्याला नख लावण्याचे काम केले. त्या महिलेचे नाव म्हणजे इंदिरा गांधी. त्यामुळे आता संविधानावर गप्पा मारणार्‍या काँग्रेसने आणीबाणी लादून संविधानाचा अपमान केला होता, हे विसरू नये. तो दिवस आठवला, तर आजही अंगावर काटा येतो. मात्र, आता तशी परिस्थिती पुन्हा कधीच निर्माण होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भारत सुरक्षित आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121