पंढरपूर विठ्ठल- रुक्मिणीमंदिरात आढळले भुयार

    31-May-2024
Total Views | 272

Pandharpur Vithanl Rukhmini Temple


मुंबई :   लाखो हिंदू भाविकांच अराध्य दैवत असलेलं क्षेत्र ‘पंढरपूर’ याच पंढरपूरमधील विठ्ठल- रुक्मिणीच्या मंदीरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तर याच मंदिराच्या सुशोभिकरणाच्या दरम्यान विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आता एक भूयार सापडले आहे. तसेच हे भुयार सात ते आठ फुटाचे असल्याचे आढळले आहे. याच भूयाराच्या आत मध्ये देवाची एक मुर्ती देखील असल्याची माहिती समोर आली आहे. हे भुयार मंदिर परिसरातील कान्होपात्रा मंदिराजवळ सापडलं आहे.

हे मंदीर एक प्राचीन काळातील मंदीर म्हणून देखील या मंदिराची एक विशिष्ट अशी ओळख आहे. तसेच सध्या या मंदीराची चौखांबी, गाभारा,व रुक्मिणी मातेचा गाभारा येथे पुरातत्व विभागाच्या देखरेखेखाली या गाभाऱ्याचे काम सुरु आहे. तसेच संपूर्ण मंदिराच्या देखील सुशोभिकरणाचे काम चालु आहे.

तसेच याची संपूर्ण माहिती मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. तसेच आता पुरातत्व विभागाचे आधिकारी देखील याची पाहणी करायला येणार आहेत. ही बातमी भाविकांसाठी अत्यंत आनंद देणारी बातमी आहे. तसेच या भुयारामुळे आता पुरातन काळातील काही माहिती देखील समोर येण्याची शक्यता आहे. व आता खऱ्या अर्थाने हे पंढरपुरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदीर प्राचीन मंदीर म्हणून पुन्हा एकदा ओळखले जाणार आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121