मुंबई: गुगलने स्मार्टफोन बनवण्यासाठी तामिळनाडू राज्याला पसंती दिली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन प्रकल्पासाठी गुगलने तामिळनाडू राज्याला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू सरकारची व गुगल व्यवस्थापनात याविषयी चर्चा घडलेली आहे. अद्याप यातील व्यवहाराची माहिती समोर येऊ शकली नाही.
हा माहिती ' खाजगी' असल्याने यांची अधिक माहिती मिळू शकली नसली तरी आगामी पिक्सेल ' मोबाईल निर्मितीसाठी गुगल कंपनीची मातृसंस्था अल्फाबेट कंपनीने हे 'डिल' केले आहे. तसेच यामध्ये तैवानची उत्पादन कंपनी फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी (Foxconn Technology) या कंपनीसोबत यासाठी हातमिळवणी केली गेली आहे.
गुगलने भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे ठरवले होते. यासाठी चीनऐवजी भारताला प्राधान्य देण्याचे गुगलने ठरवत इथे गुंतवणूक करण्याचे कंपनीने ठरवले आहे. चीनमध्ये आर्थिक स्थिती खालावल्याने तसेच अनेक अडथळ्यांमुळे भारताला प्राधान्य गुगलने दिले असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
त्यामुळेच आगामी काळात गुगलची अत्याधुनिक उत्पादन कंपनी तामिळनाडू येथे प्रस्थापित होणार आहे. याविषयी गुगलने कुठलीही माहिती प्रसारमाध्यमांना दिली नाही. यापूर्वी अँपल, सॅमसंग या कंपन्यांनी देखील उत्पादन भारतात सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी भारताला उत्पादन हब बनवण्याच्या प्रक्रियेत आता गुगलची भर पडली आहे.